मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
सोनगिरी (कर्जत जवळ) (Songir (Karjat)) | किल्ल्याची ऊंची :  2500 | ||
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग | डोंगररांग: लोणावळा | ||
जिल्हा : रायगड | श्रेणी : मध्यम | ||
महाराष्ट्रात सोनगिरी नावाचे काही किल्ले आहेत. एक नाशिक जिल्ह्या्तील सोनगिरी, तर दुसरा धुळ्या जवळचा सोनगिरी आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत जवळचा सोनगिरी. गडकिल्ल्यांचा अभ्यास करतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे त्यांचे स्थान. गडकिल्ले साधारणत: घाटाच्या पायथ्याशी, घाटाच्या माथ्यावर बांधलेले आढळतात. रायगड जिल्ह्यातील हा सोनगिरीचा किल्ला सुध्दा ऐन बोरघाटाच्या पायथ्याशीच आहे. या किल्ल्याला ‘आवळसचा किल्ला’ असे ही म्हणतात. |
|||
|
|||
पहाण्याची ठिकाणे : | |||
गडावर जातांना थोडीशी तटबंदी लागते. गडमाथा फारच चिंचोळा आहे. त्यावर पाण्याच्या दोन टाक्यां व वाड्यांचे चौथरे आहेत. गडावरुन बोरघाटाचे सुंदर दृश्य दिसते. समोरच राजमाची, ढाकगड, भिवगड, प्रबळगड असे सर्व किल्ले लक्ष वेधून घेत असतात. | |||
पोहोचण्याच्या वाटा : | |||
१) पळसदरी मार्गे :- पळसदरी हे खंडाळा घाटाच्या पायथ्याचे रेल्वे स्थानक. रेल्वे स्थानकाच्या बाहेरच एक छोटेसे धरण आहे. मुंबईहून रेल्वेने कर्जतच्या पुढे ३ किमी अंतरावर असणार्या पळसदरी रेल्वे स्थानकावर उतरायचे. पळसदरी रेल्वे स्थानकावरुन समोरच सोनगिरीचा किल्ला दिसतो. पळसदरी मधून १५ मिनिटाच्या अंतरावर ‘आवळस ’ गावात पोहोचायचे. आवळसपासून पुढे १५ मिनिटाच्या अंतरावर असणार्या ‘नावली’ गावात पोहोचायचे. हेच किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावातूनच किल्ल्यावर जाण्यासाठी ठळक वाट आहे. गावातून किल्ल्यावर जातांना दोन टेकाडं ओलांडावी लागतात. साधारणत: एक ते सव्वा तासात आपण किल्ल्याच्या कातळकड्यापाशी पोहोचतो. कातळकड्याच्या पायथ्यापासून डावीकडची वाट धरायची आणि कातळकडा उजवीकडे ठेवून एका घळीतून वर चढायचे. किल्ला आणि त्याच्या बाजूला असणार्या डोंगराच्या बेचक्यात आपण पोहोचतो. घळीतून वर जाणारी वाट निसरडी असल्याने जरा जपूनच चढावे लागते. बेचक्यातून उजवीकडे वर जाणारी वाट धरायची आणि ५ मिनिटात गडमाथा गाठायचा. २) जामरूंग मार्गे :- कर्जत - खोपोली रेल्वेमार्गावर पळसदरीच्या पुढे जामरूंग स्टेशन आहे. येथे उतरून मुंबईच्या दिशेला चालत येतांना वाटेत रेल्वेचा बोगदा लागतो. या बोगद्याच्यावर जाणारी वाट पकडून वर गेल्यावर किल्ल्याच्या डोंगराची एक धार खाली उतरलेली दिसते. या धारेवरून किल्ल्यावर जाता येते. पुढे या वाटेला पळसदरी मार्गे येणारी वाट मिळते. 3) बीड (कर्जत) मार्गे :- कर्जतच्या श्रीराम पुलावरून बीड गावात जायला टम टम रिक्षा मिळतात. कर्जत ते बीड 20 रुपये घेतात. बीड गावामधून मराठी शाळेच्या मागून किल्ल्यावर जाणारी वाट आहे. या वाटेने किल्ल्यावर जायला दीड तास लागतो. | |||
राहाण्याची सोय : | |||
गडावर राहण्याची सोय नाही. | |||
जेवणाची सोय : | |||
गडावर जेवणाची सोय नाही. | |||
पाण्याची सोय : | |||
गडावर पिण्याचे पाणी नाही. | |||
जाण्यासाठी लागणारा वेळ : | |||
नावली मार्गे २ ते ३ तास लागतात. जामरूंग मार्गे २ तास लागतात. बीड गावामार्गे दिड तास लागतो. | |||
जाण्यासाठी उत्तम कालावधी : | |||
वर्षभर |
डोंगररांग: Lonavala | कोरीगड (कोराईगड) (Korigad) | लोहगड (Lohgad) | मोरगिरी (Morgiri) | मृगगड (Mrugagad) |
राजमाची (Rajmachi) | सोनगिरी (कर्जत जवळ) (Songir (Karjat)) | सुधागड (Sudhagad) | तैलबैला (Tailbaila) |
तिकोना (Tikona) | तुंग (Tung) | उंबरखिंड (Umberkhind) | विसापूर (Visapur) |